गोष्ट साधीच .. पण मजेशीर......
.
.
कामानिमित्य गेल्या आठवड्यात चिपळूण ला गेलो होतो, एका रेसिडेन्शिअल अपार्टमेंट प्रोजेक्ट च्या दोन विंगचा लाईन आउट पावसाळ्या पूर्वी केला होता, नंतर जुलै ची लेह सफर, आणि कोकणातला पाउस अशी साधारण तीन महिन्याची विश्रांती... त्यामुळे पाउस कमी झाल्यावर पुढची आखणी करण्याच्या दृष्टीने मिटींग होती. फक्त चर्चा .. त्यामुळे मोटरसायकलने गेलो, मालक कोकणी.. .. खारवी समाजातला, 'हज' ची यात्रा करून आलेला... एकदम प्रेमळ, त्यांनी मला सर्व्हे करताना - कामाला नेहमी कार ने हिंडताना बघितलेलं, त्यांना मी रत्नागिरीतून चिपळूण पर्यंत बाईकने गेलो ह्याचंच आश्चर्य ... मग माझा मित्र आणि त्यांचा कंत्राटदार - इंजिनियरने आणखी 'हवा' दिली... "अहो शेठ, चिपळूण काय... हे आत्ता जुलै मध्ये रत्नागिरीतून जम्मू- श्रीनगर - लेह - दिल्ली असे हिंडून आले...."
झालं........
सगळ्या कामाच्या गोष्टी बाजूला ठेवून पुढचा अर्धा तास तो भला माणूस मला ह्या "अगोचर'' पणाबद्दल बोलत होता. अर्थात काळजीपोटी.. सगळी 'शाळा' करून झाल्यावर नेहमीप्रमाणे "रूह अफ्जा" चा ग्लास आणि काळया खजुराचा बाउल पुढे सरकवत त्यांनी शेवटचा बॉम्ब टाकला...
.
.
.
.
.
.
.
.
"हिकरशी थय दिल्लीपर्यंत फटफटीवर्रून गेलंव...... बोचो लाल नाय झैलो ??"
.
.
.
.
तुम्ही कधी काळा खजूर 'बी' सकट खाल्लाय का ? मी खाल्लाय !!!!
.
.
.
.
.
.
.
.
"हिकरशी थय दिल्लीपर्यंत फटफटीवर्रून गेलंव...... बोचो लाल नाय झैलो ??"
.
.
.
.
तुम्ही कधी काळा खजूर 'बी' सकट खाल्लाय का ? मी खाल्लाय !!!!
(25 Oct.12)
अस्सल कोंकणी
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete